breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

काॅंग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या भाजप प्रवेशासाठी माझ्या बंगल्यासमोर रांगा

जळगाव, – ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या पक्षात राहायला तयार नाहीत. त्यामुळेच आपल्या मुंबईतील बंगल्याावर त्यांच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात,’ असा दावा करत भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणूक भाजपच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. जळगावात झालेल्या भाजपच्या विस्तार सभेत गिरीश महाजन बोलत होते.

‘आघाडीचे नेते भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याने पुढे पाहू, असं म्हणून आपल्याला त्यांना टाळावं लागत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळून 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत,’ अशी खोचक टीका गिरीश महाज यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button