breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरेंचं भाजपला आवाहन, वाचा काय म्हणाले

मुंबईतील कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्हीही एकमेंकांविरूद्ध टीका करत आहेत. यातच हा वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.

कांजूरमार्गची जमीन ही केंद्राची असेल नसेल हा वाद आपण सोडवू शकतो. केंद्रानं आणि राज्यानं मिळून चर्चेदरम्यान हा वाद सोडवला पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेसोबत संवाद साधला. यावेळी राज्यातील करोनाची परिस्थिती, नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सूचना तसंच, सध्या वादात सापडलेल्या कांजूरमार्गच्या मेट्रो ३ कारशेडप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. याचवेळी मेट्रो कारशेडवरून सरकारला वेळोवेळी लक्ष्य करणाऱ्या विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केलं आहे.

कांजूर मेट्रो कारशेडचा वाद चालला आहे तो जनतेच्या हिताचा नाहीये. माझं विरोधी पक्षाना आवाहन आहे तुम्ही या आणि हा प्रश्न सोडवा. आम्ही तुम्हाला श्रेय द्यायला तयार आहे. चर्चेदरम्यान कांजूर मेट्रो कारशेशेडचा हा प्रश्न सोडवू शकतो. हा माझ्या अहंकाराचा प्रश्न नाहीये तुमच्याही नसला पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button