कंटेनमेंट झोन मध्ये बकरी ईदला कोणतीही शिथिलता नाही – आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी
कल्याण कोरोनच्या पार्श्वभूमीवर राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घेण्यास सुरुवात झाली. या लॉकडाऊन काळात 5 महिन्याचा कालावधी उलटला परंतु या 5 महिन्यांमध्ये शेतकरी आणि पशुपालन करणारा वर्ग देखील भरडला गेला आहे. बकरी ईद आता जवळ आली आहे. त्यामुळे खरीप हंगाम लक्षात घेता पशुधनाची खरेदी-विक्री सुरु करणे आवश्यक असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरांचा बाजार सुरु करण्याबाबत परवानगी देण्यात आली होती. परंतू या बाजाराच्या आवारात बकरी बाजारासाठी मोठया प्रमाणात आवक वाढल्यामुळे अटी व शर्तींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे जनावरांची ऑनलाइन खरेदी विक्री करण्याची परवानगी दिली आहे. तसेच महापालिकेने 19 जुलै रोजी पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात आला. यावेळी घोषीत केलेल्या हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये बैलबाजार या प्रभागातील सांगळेवाडी, पत्रीपुल हा परिसर चा सहभाग होतो. त्यामुळे महापालिकेकडून देण्यात आलेली सदर परवानगी पुढील आदेश होईपर्यंत रदद् करण्यात आली आहे.
मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे आणि त्यामुळे शेतकरी आणि धनगर समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच प्रमाणे बकरी ईद जवळ आली आहे त्यामुळे खूप लांबून लोकं आपले बकरे घेऊन आलेलं आहे. तर आम्ही जास्तीत जास्त ऑनलाइन विक्रीवर भर दिला आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून आम्ही ही विक्री करत असून शासनाकडून आम्हाला थोडी सूट द्यावी आणि प्रशासनाकडून सहकार्य मिळावे अशी मागणी बकरा विक्रेत्यांकडून केली जात आहे.
बकरी ईद 2020 बाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या अन्वये सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहणार आहे. या दरम्यान नागरिकांना जी जनावरे खरेदी करायची आहेत ती त्यांनी ऑनलाईन पध्दतीने खरेदी करावीत. तसेच कन्टेनमेंन्ट क्षेत्रामध्ये लागू करण्यात आलेले क्षेत्रात निर्बंध कायम राहतील, त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निगर्मित केले आहेत.