breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

एकनाथ खडसे गेल्यामुळे भाजपाचे नुकसान नाही : गिरीश महाजन

मुंबई । प्रतिनिधी

एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देत, आज राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. आपण पक्षावर नाराज नसून, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले होते. आता यावर माजी मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी याविषयी भाष्य करत देवेंद्र फडणवीस यांनी छळ केल्यामुळे पक्ष सोडल्याचा खडसेंनी केलेला कांगावा अत्यंत चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.

गिरीश महाजन म्हणाले की, खडसेंवर पक्ष सोडण्याची पाळी का आली याचे आत्मचिंतन त्यांनी केले तर नवीन पक्षात ते सुखी राहतील. भाजपच्या कोणत्याही नेत्याबाबत होणारा निर्णय हा सामूहिक असतो. मात्र, फडणवीस यांना टार्गेट करणे खडसेंना सोपे वाटत असावे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button