आघाडीसाठी राहुल गांधी- शरद पवार यांच्यात चर्चा
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आघाडी करण्यावरून बोलणी 40 जागांवर थांबली असताना उर्वरित जागांचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसेने कंबर कसली आहे. याच पार्श्वभुमीवर आज सायंकाळी काँग्रेसचे अध्य़क्ष राहुल गांधीआणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली.
महाराष्ट्रात युतीचे गुऱ्हाळ अद्याप सुरुच असून काँग्रेस आणि राष्टवादीने यामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आघाडीसाठी 40 जागांच्या वाटपावर शिक्कामोर्तब झाले असून उर्वरित आठ जागांसाठी मित्रपक्षांनी किती आणि कोणत्या जागा लढवायच्या यावर चर्चा करण्यासाठी आज सायंकाळी नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी राहुल गांधी यांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मर्लिकार्जुन खरगे हे देखिल उपस्थित होते.
https://twitter.com/ANI/status/1082988124064673793