breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संपत्तीच्या वादातून भावानंच पेटवलं भावाचं घर, 4 जणांचा मृत्यू

सोलापूर – घरातील कौटुंबिक वादातून थोरल्या भावाने झोपेत असलेल्या आई व पोलीस असलेल्या भावासह भावाची पत्नी व लहान मुलगा यांना अंगावर रॉकेलसदृश्य ज्वालाग्रही पदार्थाने पेटवून देवून हत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास खांडवी तालुका बार्शी येथे घडली. कस्तुरबाई कुरुंदास देवकते (वय 65), राहुल कुरुंदास देवकते (वय 35), सुषमा राहुल देवकते (वय 30) व आर्य राहुल देवकते (वय 2) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, खांडवी येथे आई कस्तुरबाई व त्यांची दोन मुले राहुल व रामचंद्र व त्यांचे कुटुंब असे एकत्र राहत होते. शेती हा कुटुंबाचा व्यवसाय आहे. दोन्ही भावात मिळून 12 एकर शेती आहे. मयत झालेला राहुल हा सध्या उस्मानाबाद येथील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नाईक म्हणून कार्यरत होता तर रामचंद्र हा शेती करत आहे. राहुल हा दररोज उस्मानाबादवरुन ये-जा करुन नोकरी करत होता. मागील एक महिन्यापूर्वी भावाभावात वाद झाल्याची कुजबुज गावकर्‍यात होती. शुक्रवारी मध्यरात्री राहुल याचे कुटुंब व आई घरात झोपले असताना रामचंद्र उर्फ तात्या कुरुंदास देवकते (वय 37) याने झोपेत असलेल्या वरील चौघांच्या अंगावर रॉकेलसदृश्य ज्वालाग्रही पदार्थ अंगावर टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

घटनेनंतर स्फोट झाल्याने शेजारच्यांना हा प्रकार समजला. घरामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असल्याने कोणाला आत जाता आले नाही. 15 मिनिटात पोलीस घटनास्थळी आल्यानंतर गावकर्‍यांनी पोलिसांच्या मदतीने भाजलेल्या चौघांंना बाहेर काढले. यामध्ये आर्य व सुषमा यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला होता तर राहुल व आई कस्तुरबाई यांना उपचारासाठी बार्शी व त्यानंतर उस्मानाबादमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये रामचंद्र हा देखील भाजला असून त्याच्यावर उस्मानाबाद येथे उपचार चालू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button