breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
मुंबईत शाळेमध्ये विषबाधेमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू
गोवंडीत महापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. चांदनी साहिल शेख असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.
गोवंडीतील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत शुक्रवारी सकाळी ही दुर्देवी घटना घडली. शाळेत दिल्या जाणाऱ्या औषधामुळे आणखी काही विद्यार्थ्यांनाही विषबाधा झाली असून त्यांना जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.