breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

PM Kisan निधीचे पैसे 20 लाख अयोग्य व्यक्तींच्या खात्यात; करावे लागणार ‘हे’ काम नाहीतर…

पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार 20 लाख 48 हजार अयोग्य लाभार्थींच्या खात्यामध्ये 1 हजार 364 कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे. RTI मधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाब राज्यातील सर्वात जास्त अपात्र लाभार्थींना या योजनेचा फायदा झाला आहे. त्यानंतर आसाम, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.

अल्प आणि सीमांत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारनं 2019 साली ही योजना सुरु केली आहे. 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये या योजनेच्या अंतर्गत जमा करण्यात येतात. 25 डिसेंबर रोजी या योजनेतील सातव्या टप्प्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे.

या योजनेच्या सर्व अयोग्य लाभार्थींना पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत. पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत ज्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे, त्यांना जवळच्या ब्रँचला ही माहिती द्यावी लागेल. त्यानंतर बँक खात्यामधून पैसे कट केले जातील. बँक खात्यामध्ये पैसे नसतील तर त्यांना रक्कम बँकेत जमा करावी लागेल.

https://bharatkosh.gov.in/ या ऑनलाईन पोर्टलवर देखील पैसे परत करण्याचा पर्याय आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button