breaking-newsTOP NewsUncategorizedदेश-विदेशमराठवाडामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

…अन् भाजपाच्या नेत्यांसोबत आम्ही आनंदाने उड्या मारल्या, प्रियंका गांधींनी शेअर केली आठवण

नवी दिल्ली । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच म्हणजे संपूर्ण जगासाठी उत्सुकतेचा क्षण असतो. जगभरातील क्रिकेटप्रेमी यावेळी हातातील कामं टाकून क्रिकेट पाहत बसतात. यात नेतेमंडळी तरी कसे मागे राहतील? असाच एक किस्सा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शेअर केलाय. तसेच, आजच्या मॅचसाठी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या आहेत. प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं की, माझी खूप स्पेशल मेमरी आहे. काही वर्षांपूर्वी मी कराची येथे इंडिया विरुद्ध पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी गेले होते. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही, जेव्हा भारत विजयी ठरला. जेवढे नेते गेले होतो, भाजपाचे असो वा काँग्रेसचे आम्ही सगळेच इतके खूश झालो की, आनंदाने उड्या मारल्या आम्ही.”

क्रिकेटच्या मैदानात सारेजण आपलं शत्रुत्व-मित्रत्व विसरून खेळाडू बनतात. तसेच, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच असली की सगळे भारतीय एक होऊन क्रिकेटचा आनंद लुटतात. राजकारणातील विरोधक-सत्ताधारीऱ्यांचीही अशावेळी क्रिकेटप्रेमी म्हणून एकी होते. त्यामुळे क्रिकेट पाहायला गेल्यावर अनेक नेतेमंडळी आपली विचारधारा विसरून एकमेकांसोबत क्रिकेटचा आनंद लुटतात. असाच एक किस्सा प्रियंका गांधी यांनी शेअर करून क्रिकेटप्रेमाची प्रचिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button