breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडी

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे भीषण अपघात; ट्रक चालकाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा (Lanja) येथे झालेल्या भीषण अपघातात (Severe Accident) ३५ वर्षीय तरुण ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक व अर्टिगा कारचा हा भीषण अपघात झाला. रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला आहे. विजेश विलास सावंत (राहणार पुनस, ता.लांजा) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. दरम्यान, या अपघातात कारमधील आणखी एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाही. कारमधील सगळे शिंदे कुटूंब चिपळूण येथील आहे. (a truck driver has died on the spot in a tragic accident)

आंजणारी घाटात काजळी नदीच्या पुलावरून ही कार नदीच्या दिशेने उडाली. या कारमध्ये चारजण होते. कार मुंबईच्या दिशेने निघाली होती. तर ट्रक गोव्याकडे निघाला होता. काजळी नदीच्या पुलावर ट्रक आणि कारचा अपघात झाला. अपघातात कारमधील चारजण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रत्नागिरी सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, हा भिषण अपघात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात कारची झालेली अवस्था पाहूनच थरकाप उडतो, इतकी ही धडक भीषण होती. यात ट्रक नदीत कोसळून ट्रक चालकाचा मृत्यू झाला. अपघातस्थळी तत्काळ ग्रामस्थ, लांजा पोलिसांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

चिपळूण येथील रहिवाशी असलेले शिंदे कुटुंबीय रविवारी रात्री मालवण येथून चिपळूणकडे निघाले होते. तर ट्रक चालक विजय विलास सावंत हे आपल्या ताब्यातील ट्रकमधून सिमेंट घेऊन रत्नागिरी येथून लांजाकडे येत होते. याचवेळी आंजणारी घाट उतरत असताना ट्रक चालक विजय सावंत यांना आपल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले. आंजणारी वरचा स्टॉप या ठिकाणच्या तीव्र उतारावर ब्रेक फेल झाले असल्याने आणि याच दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात लक्झरी गाड्यांची रहदारी असल्याने ट्रक थांबवायचा कसा, असा मोठा प्रश्न ट्रक चालक सावंत यांच्यासमोर निर्माण झाला होता. तरीही मोठ्या शिताफीने त्यांनी त्याही स्थितीत ट्रक अंजाणारी पुलापर्यंत आणला मात्र सिमेंट भरले असल्याने आणि तीव्र उतार असल्याने या ठिकाणी समोर आलेल्या अर्टिगा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातात अर्टिगा कार अपघातानंतर दोन्ही वाहने पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातातमध्ये ट्रक चालक विजय सावंत यांचा जागीच मृत्यू झाला .याबरोबरच अर्टिगा कार चालक समीर प्रदीप शिंदे त्यांची आई सुहासिनी प्रदीप शिंदे (वय ६१ ) तर समीर शिंदे यांच्या पत्नी समृद्धी शिंदे (वय २९) आणि वडील प्रदीप हिम्मतराव शिंदे (वय ६५) हे दोघे जण गंभीर जखमी झाले.

शिंदे हे ड्रायव्हविंग करत होते. ते मुंबई मरोळ पोलीस प्रशिक्षण सेंटर येथे कार्यरत होते. त्यांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कार मधील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून खात्रीलायक नाव समजू शककेले नाही. रविवारी मध्यरात्री उशिरापर्यंत अपघातातील जखमींच्या नावांची नोंद करण्याचे काम सुरु होते.अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button