विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ, शेलारांची शेट्टींवर टीका
रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या आजपासून सुरू होणाऱ्या किसान आत्मनिर्भर यात्रेस आशिष शेलार यांच्या हस्ते यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला कडाडून विरोध करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला.
राजू शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे. काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता. त्यात एक शिक्षक मोहापायी वाहवत जातो. शेवटी त्याला हाती तुणतुणे हाती धरण्याची वेळ येते. आताही तेच चित्रं दिसत आहे. शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्या एका नेत्याला एका विधानपरिषदेसाटी हाती तुणतुणे धरण्याची वेळ आली आहे, अशी टीका शेलार यांनी केली.
वाचाः खुला प्रवर्ग हा ‘कोटा’ नाही, खुला प्रवर्ग सर्वांसाठीच; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही. अंबांनी आणि अदानीमुळे तर शेतकऱ्यांच्या हक्कांना कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. अंबानी, अदानींनी शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लावला तर त्यांच्यासाठी मी मुंबईत काठी घेऊन बसलो आहेच, असंही त्यांनी सांगितलं.