पुढील 2 वर्षात देश टोलनाकामुक्त होणार – नितीन गडकरीं
मागील काही दिवसांपासून टोलनाक्यांवर फास्टॅगचा वापर केला जात आहे. ही प्रणाली यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. फास्टॅगमुळे टोल संकलन वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर आता रशियाच्या मदतीने देशात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) चा वापर केला जाणार असून, यामुळे पुढील 2 वर्षात देश टोलनाकामुक्त होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
गडकरींनी या नवीन प्रणालीबाबत माहिती देताना सांगितले की, ही जीपीएस प्रणाली लागू केल्यानंतर हे पैसे थेट बँक खात्यातून वजा केले जाणार आहेत. वाहनांच्या हालचालीच्या आधारे हे पैसे वसूल केले जाणार आहेत. सध्या सर्व व्यावसायिक वाहने ट्रॅकिंग सिस्टमच्या अंतर्गत येत आहेत, तर सरकार जुन्या वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्याची योजना सुरू आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार असून, कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य मिळणार आहे.