breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारत आशियाई गेम्समध्ये खेळणार नाही; बीसीसीआयने केलं जाहीर

BCCI : चीनमधील हांगझू येथे होणाऱ्या आशियाई खेळांच्या क्रीडा कार्यक्रमात क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता या खेळाचा विविध खंडांमध्ये अधिक प्रचार व प्रसार होण्यात मदत होईल. मात्र या स्पर्धेत भारतीय खेळाडू एक खेळ सोडून इतर सर्व खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. भारतीय संघ आशियाई खेळामध्ये सहभागी होणार नसल्याचं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे.

ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाच्या सर्वसाधारण सभेत या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करावा असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भारतीय संघ इतर आशियाई संघांसोबत खेळताना दिसेल असे बोलले जात होते. मात्र बीसीसीआयने आपला संघ पाठवणार नसल्याचे सांगितल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. बीसीसीआयने या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

भारतीय पुरूष आणि महिला संघाने आधीच संपूर्ण वर्षाचे कार्यक्रम आखलेले असतात. त्यानुसार भारतीय महिला आणि पुरूष संघ काही दौऱ्यांवर असणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाला आशियाई गेम्समध्ये सहभागी होता येणार नाही, असे बीसीसीआयने सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button