भागिदारीच्या दरम्यान गोलंदाजी करणे अवघड – अश्विन
सिडनी – सिडनी येथे होत असलेल्या एकमेव सराव सामन्यात नवख्या असलेल्या ऑस्ट्रेलियन एलेव्हन संघाने मजबूत भारतीय गोलंदाजी समोर अनपेक्षितपणे धडाकेबाज फलंदाजी करताना दोन शतकी तर एक अर्धशतकी भागिदारी करत भारतीय गोलंदाजांना बळी मिलवण्यासाठी अक्षरशः झगडायला भाग पाडले.
यावेळी भारतीय गोलंदाजांच्या अपयशा बाबत बोलताना भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन म्हणाला की, ‘ऑस्ट्रेलियात गोलंदाजी करणे अवघड असते त्यातल्या त्यात जेंव्हा समोरचा संघ भागिदारी करण्यावर भर देत असेल तर ते काम आणखिनच अवघड होउन जाते. त्यातल्या त्यात आमच्याकडे सध्या पाचव्या गोलंदाजाची कमी असल्याने आम्हाला मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करणे जास्त आव्हानात्मक वाटत होते’.
तसेच एक फिरकीपटू म्हणुन मला ठराविक टप्प्यावर गोलंदाजी करणे महत्वाचे होते. जरी मला पहिल्या डावात त्या खेळपट्टीकडून विशेष लाभ झाला नाही तरी पुढील दावात त्या खेळपट्टीकडून मला मदत मिळेल अशी मला अपेक्षा आहे. असेही त्याने यावेळी सांगितले.