breaking-newsक्रिडा

फलंदाजीत सुधारणा गरजेची – विराट कोहली

नवी दिल्ली: इंग्लंड दौरा आमच्या साठी अपयशी ठरला असला तरी या दौऱ्यात आम्हाला आमच्या गोलंदाजांची क्षमता कळाली आहे. आणि आमच्या गोलम्दाजांनी तीच कामगिरी वेस्ट इंडीज दौऱ्यात देखिल पुन्हा केली आहे. त्यामुले आमची गोलंदाजी सध्या चांगली आहे मात्र आम्हाला फलंदाजीत सुधारणा कराण्याची गरज आहे. असे प्रतिपादन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मुंबई येथे पत्रकार परिषद झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ तीन टी20, चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

सध्याच्या भारतीय संघाकडे सर्वोत्कृष्ट गोलंदाजांची फळी आहे. पण फलंदाजांनी आपली जबाबदारी समजून चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. जर फलंदाजांनी आपली जबाबदारी ओळखली नाही तर संघाचे नुकसान होते असेही यावेळी विराट म्हणाला. त्यामुळे भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी ओळखून सर्वोत्तम कामगिरी करायला हवी. खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणेला वाव आहे. जर प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी ओळखून खेळ केल्यास सामनाच नाही, तर मालिकाही जिंकू असा विश्‍वासही यावेळी विराटने व्यक्त केला आहे.

यावेळी विराट म्हणाला की, संघातील खेळाडूंच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. खेळाडू कसे तंदुरूस्त राहतील याची काळजी घेण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आम्ही सज्ज आहोत. इंग्लंड दौऱ्यामध्ये झालेल्या चुका या दौऱ्यात होणार नाहीत, याची आम्ही विशेष काळजी घेणार आहोत, अशी ग्वाही यावेळी विराट कोहलीने दिली आहे. इंग्लंड दौऱ्यातून भारतीय संघाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ आपली सर्वोत्तम कामगिरी करेल, असे रवी शास्त्री म्हणाले.’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button