breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

‘कोरोना’ वायरसचा पुन्हा एकदा IPLवर संकट, IPLवर बंदी घालण्याची मागणी

‘कोरोना’ वायरसचा पुन्हा एकदा आयपीएलला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. ‘कोरोना’ वायरसमुळे आयपीएल पुढे ढकला, असे मत महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केले होते. आता ‘करोना’ वायरसमुळे पुन्हा एकदा आयपीएलला धक्का बसणार असल्याचे दिसत आहे.

आयपीएलचे महाराष्ट्रामध्ये सामने होणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. पण आता कर्नाटक सरकारने आयपीएलवर बंदी घालावी किंवा पुढे ढकलावी, अशी मागणी थेट केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली तर बंगळुरुमध्ये सामने होणार नाहीत. जर बंगळुरुमध्ये सामने होऊ शकले नाहीत, तर हा कर्णधार विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) यांना मोठा धक्का असेल. त्यामुळे कोहलीच्या आरसीबी संघापुढे आता मोटे आव्हान उभे ठाकले आहे.

आयपीएलमध्ये प्रत्येक संघाचे एक होम ग्राऊंड असते. या होम ग्राऊंडवर संघाला चांगलाच पाठिंबा मिळतो, त्याचबरोबर होम ग्राऊंडवर संघाच्या विजयाची सरासरीही जास्त असल्याचे पाहायला मिळते. पण जर आता कर्नाटकमध्ये सामने झाले नाही तर आरसीबीचे सामने बंगळुरुला होणार नाहीत. त्यामुळे एक तर त्यांना दुसरे होम ग्राऊंड शोधावे लागेल किंवा आयपीएल पुढे ढकलण्याची विनंती बीसीसीआयला कराी लागेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button