breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणे

चांगला समाज निर्माण करणे हे शिक्षकांचे ध्येय असावे

  • पुरस्कार वितरण सोहळ्यात मा.खा.राजू शेट्टी यांचे प्रतिपादन

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

जसा शेतकरी शेतीची मशागत करतो व मग चांगलं पीक येतं, तसे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचारांची मशागत करावी व चांगला समाज, विद्यार्थ्यांचे भवितव्य व पर्यायाने देश घडवावा असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी जगदीशब्द फाउंडेशन आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षक दिन म्हणून जगदीशब्द फाउंडेशन व परिवर्तन सामाजिक संस्था यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय क्रांतीसुर्य व क्रांतीज्योती पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख, पत्रकार श्रीरंग गायकवाड, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, ज्येष्ठ विधीज्ञ विजय कुरले, साहित्यिक नारायण सुमंत, व्याख्याते जगदीश ओहोळ, परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील सर्व जिल्ह्यातून पुरस्कारार्थी निवडण्यात आले होते. शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, आरोग्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश ओहोळ व सूत्रसंचालन जालिंदर राऊत यांनी केले तर आभार महादेव वाघमारे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button