breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा.. : खासदार संजय राऊत

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित २ रे ऑनलाइन बेळगाव मराठी साहित्य संमेलन संपन्न

पुणे | प्रतिनिधी

“बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र हा झाला पाहिजे यासाठी हुतात्मे दिलेले आहेत , तिथल्या व्यक्तीला जेव्हा काठी बसते त्याचा वळ आम्हाला जाणवतो .सीमाभागात मराठी संस्कृती नांदते आहे.सीमाभागात शैक्षणिक व साहित्य संमेलनातून भाषा संस्कृतीचे संवर्धन केले जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक सहकार्य करण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणून बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा आहे.असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.अखिल मराठी भारतीय साहित्य परिषद आयोजित 2 रे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आज पार पडले .खा राऊत यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले .त्या वेळी ते बोलत होते .ज्येष्ठ पत्रकार ,साहित्यिक श्रीराम पचिंद्रे यांनी संमेलनाचे अध्यक्ष स्थान भूषविले तर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचेे संस्थापक व राष्ट्रीय कार्याध्यक्ष , सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते .

केंद्र आणि राज्यांनी समन्वय साधून बेळगाव चा प्रश्न सोडवावा : गोरे

पाचहजार मातृभाषा भाषा शब्दकळा मूल जन्म घेताना असते म्हणून मातृभाषा ही महत्वाची आहे म्हणून विज्ञान तंत्रज्ञानात यशस्वी होण्यासाठी मातृभाषेत शिक्षण हवं. भाषा आणि संमेलने ही वैश्विक आहेत. सीमाभागातील 865 गावात मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा आहे. कर्नाटक महाराष्ट्र राज्यांनी एकत्र येवून समन्वयाने केंद्राने मध्यस्थी करून सीमाप्रश्न निकाली काढला पाहिजे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक व संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद गोरे यांनी केले .

संमेलनाच्या सुरुवातीला सीमाभागात साहित्य संमेलन ही मराठी संस्कृतीला ऊर्जा देणारी आहे. संमेलने भाषा संस्कृतीचे संवर्धन , साहित्यिकांना लिहिण्याचे बळ मिळावे , मराठी वाचन संस्कृती रुजावी व नवोदित कवींना संधी मिळावी ही भूमिका सीमा भागातील संमेलनाची आहे. यासंमेलनाना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक तरतुद करण्यात यावी असे प्रास्ताविक मध्ये अखिल भारतीय परिषद चे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यानी सांगितले.

सकाळी ११ वा. संमेलनाला दूर दृश्य प्रणाली व्दारे आयोजित संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले, यावेळी उदघाटन सत्राला विशेष अतिथी म्हणून शिवसंत संजय मोरे , परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर , राष्ट्रीय विश्वस्त, राष्ट्रीय विश्वस्त सुवर्णा पवार,ज्ञानेश्वर पतंगे, डाॅ.अमोल बागूल उपस्थित होते संयोजक बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण व उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष डी.बी.पाटील यांनी सुत्रसंचालन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button