बेळगावजवळ जीप-ट्रकचा भीषण अपघात, औरंगाबादचे 5 जण जागीच ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Accident.jpg)
कोल्हापूर – बंगळुरू-पुणे महामार्गावर जीप-ट्रकचा भीषण अपघात होऊन त्यात 5 जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. भरधाव निघालेल्या जीपचे टायर फुटले आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. जीप दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला रस्त्यावर गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बेळगाव शहरातील श्रीनगर गार्डनजवळ हा अपघात घडला. सर्व मृत औरंगाबाद येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
औरंगाबादहून जीपने सहा जण बंगळुरूला निघाले होते. जीप श्रीनगर गार्डनजवळ आली असता तिचे समोरील टायर फुटले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजककावरून पलीकडील रस्त्यावर गेली. यावेळी धारवाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला जीपची जोरदार धडक बसली. धडक जबरदस्त असल्याने जीपमधील पाच जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.