पुणे-मुंबई द्रूतगती महामार्ग होणार आता अपघातमुक्त; राज्य सरकारकडून समितीची नियुक्ती!
पुणे । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
पुणे -पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्स्प्रेस वे)
वाढते अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली
आहेत. राज्य सरकार व नवी दिल्ली येथील येथील
सेव्ह लाइफ फाउंडेशन यांच्यात करार करून ही सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. ही समिती अपघातांच्या टाळण्यासाठी उपाययोजना करणार
आहे. याबाबत राज्य शासनाकडून अधिसूचनाही काढण्यात आली आहे.
बेशिस्त वाहतूक, वाहने चालवताना हलगर्जीपणा, अतिवेग यासारख्या निष्काळजीपणामुळे ‘एक्स्प्रेस
वे’वर अपघातांची मालिका सतत सुरू आहे. दिवसेंदिवस रस्त्यांवर
होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. हे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागांच्या अप्पर मुख्य सचिवांच्या
अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे. यामध्ये अध्यक्षांसह इतर १२ सदस्यांचा सहभाग
असेल. त्यामध्ये गृह विभागाचे (विशेष) प्रधान सचिव, अपर
पोलिस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास
महामंडळाचे मुख्य अभियंता, सेव्ह लाइफ फाउंडेशनचे मुख्य
सल्लागार यांचा समावेश आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांची ठिकाणे व इतर अपघातांची
शास्त्रशुद्ध माहिती एकत्रित करून सुकाणू समितीतर्फे उपाययोजना राबविण्यात येणार
आहेत. या समितीत गृह सहसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग,
परिवहन, रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलिस या विभागातील अधिकारी सदस्य म्हणून काम करणार आहेत.
अपघात कमी करण्यासाठी नक्की काय केले पाहिजे, यावर ही
समिती काम करील, असे राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेत
म्हटले आहे.