पाच राज्यांत भाजप पराभवाच्या छायेत ; केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांचे संकेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/download-2-2.jpg)
पिंपरी – पाच राज्यांची विधानसभा निवडणूक म्हणजे प्रॅक्टिस मॅच, यात विरोधक जिंकले, तरी लोकसभा निवडणुकीची फायनल मॅच नरेंद्र मोदींची टीम जिंकेल, असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेखाली असल्याचे संकेत दिलेत.
डावपेचात माहीर असणारे नरेंद्र मोदी हे लोकसभेच्या कुस्तीत राहुल गांधींना चितपट करतील असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. पुण्याच्या मावळमध्ये आमदार बाळा भेगडेंनी आयोजित केलेल्या करियर जत्रेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस आणि शिवसेना हे दलित विरोधी नाहीत अन भाजप ही दलितविरोधी नाही. हे पक्ष जर दलित विरोधी झाले तर ते निवडून येऊच शकत नाहीत, असे ठाम मत आठवले यांनी व्यक्त केले. आरपीआय सातारा लोकसभेची जागा मागणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंना तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना तिकीट देऊ, असेही त्यांनी सांगितले.