breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खेड-शिवापूर टोलनाका हटवा; ‘रामकृष्ण हरी’च्या गजरात सर्वपक्षीय आंदोलन

पुणे |महाईन्यूज |प्रतिनिधी|

खेड-शिवापूर टोलनाका हटवण्यासाठी आज पुण्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ‘रामकृष्ण हरी’च्या गजरात अभिनव पद्धतीने खेड-शिवापूर टोलनाक्यावर प्रचंड रास्तारोको केला आहे. त्यामुळे या टोलनाक्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याने कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, आंदोलन चिघळू नये म्हणून या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

२०१०मध्ये हा टोलनाका सुरू करण्यात आला होता. मात्र तो अजूनही सुरू ठेवण्यात आल्याने येथील ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. ज्या रस्त्यासाठी टोलनाका तयार करण्यात आला तो रस्ताही तयार झालेला नाही. शिवाय रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले असून त्यामुळे या रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच रोज या नाक्यावर वाहनांच्या दोन-दोन तास रांगा लागल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून हा टोलनाका हटवावा यासाठी सर्वपक्षीय टोलनाका हटाव समितीने आज खेड-शिवापूर टोलनाक्यावर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे.

हातात काळे झेंडे आणि फलक घेऊन सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थही या आंदोलनात उतरल्याने या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. या आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. तर आंदोलन चिघळू नये म्हणून पोलिसांनी टोल कंपनीशी संपर्क साधल्याने तुर्तास या टोलनाक्यावर शुल्क आकारणी बंद करण्यात आली असून वाहने मोफत सोडण्यात येत आहेत. आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button