breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खडकवासला धरणानंतर पानशेत धरणही शंभर टक्के भरले; पुणेकरांना दिलासा

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरणानंतर पानशेत धरणही शंभर टक्के भरले आहे. पावसाची हजेरी कायम असल्याने पानशेत धरणातून खडकवासला धरणात आणि खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये २५.८२ अब्ज  घनफूट म्हणजे टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

या चारही धरणांच्या परिसरात संततधार आहे. त्यामुळे ही धरणे सुमारे ९० टक्के भरली गेली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून ९४१६ क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पानशेत धरणातून खडकवासला धरणात दोन हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

धरणांच्या परिसरात तीन ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरण हे शंभर टक्के भरले आहे. त्यानंतर सोमवारी पानशेत धरणही भरले. वरसगाव धरण हे सुमारे ८५ टक्के भरले असून, टेमघर धरण हे सुमारे ६८ टक्के एवढे भरले आहे.

टेमघर धरण क्षेत्रात दिवसभरात ३२ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात अनुक्रमे ३० आणि २७ मिलिमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रात पाच मिलिमीटर पाऊस पडला. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात दिवसभरात १०८ मिलिमीटर पाऊस झाल्याने हे धरण सुमारे ७३ टक्के भरले आहे. डिंभे, चासकमान, भामा आसखेड, गुंजवणी, निरा देवघर, भाटघर आणि वीर या धरणांच्या परिसरातही संततधार कायम आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button