कोरेगाव-भीमाच्या इतिहासाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा; रामदास आठवलेंची मागणी
![Ramdas Athawale demands renaming of Aurangabad airport as Ajantha Verul Caves](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/ramdas-athawale-copy.jpg)
कोरेगाव-भिमा
कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा. हा इतिहास पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाला, तर तो सर्व मुलांनाही कळेल, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. यासाठी आपण शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करू, असेही आठवले यांनी म्हटले आहे. आठवले यांनी शुक्रवारी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी दलित-सवर्ण मुद्द्यावर बोलताना आठवले म्हणाले, दलीत-सवर्णांना जोडण्यासाठी आणि दलितांवर होणारे अत्याचा थांबवण्यासाठी देशात समता यायला हवी. तसेच देशातील दलित आणि सवर्णांमधील गैरसमज दूर व्हायला हवेत. गावागावांत एकी निर्माण व्हायलहा हवी आणि गावात एकी निर्माण झाली, की देशाचा विकास झपाट्याने होईल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2021 मध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित आदिवासी, ओबीसी आणि सवर्ण या सर्वांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करेल, असेही आठवले यावेळी म्हणाले.