breaking-newsताज्या घडामोडीपुणे

करोना: शालेय परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होणार नाही

पुणे |महाईन्यूज|

पुणे आणि मुंबईत करोनाची लागण झालेले रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय अवलंबण्यात येत आहेत. मात्र सध्या परीक्षांचा मोसम सुरू असल्याने विद्यार्थी आणि विशेषत: पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र राज्यातल्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होणार नसल्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

वर्षा गायकवाड यांनी टि्वट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. ‘राज्यात निश्चितच कोरोनाामुळे भीतीचे वातावरण आहे , पण तूर्तास शालेय परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचा विचार नाही. आरोग्य विभागासोबत आज दुपारी बैठकीनंतर , शालेय शिक्षण विभाग, शाळा आणि काॅलेज याबाबत निर्णय घेण्यात येतील,’ असे ट्विट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

महाराष्ट्राची करोना उपाययोजनांसंदर्भातली दिशा कशी असेल याची रुपरेषा आखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी एक बैठक होणार आहे. याच बैठकीचा हवाला वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान, तत्पूर्वी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व महाविद्यालय, विद्यापीठांमधील सार्वजनिक कार्यक्रम २५ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. जेथे गर्दी होण्याची शक्यता आहे असे कोणतेही कार्यक्रम २५ मार्चनंतरच करावेत, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button