‘संभाजी भिडेंना देशातून तडीपार करा’; यशोमती ठाकूर यांची मागणी
![Yashomati Thakur said that Sambhaji Bhide should be banished from the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Yashomati-Thakur-and-sambhaji-bhide-780x470.jpg)
मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्टपिता महात्मा गांधी यांच्या विषयी एक वादग्रस्त विधान केलं आहे. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या आक्षेपार्ह विधानावर समाजातील विविध घटकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यावरून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ही एक मोठी विकृती समाजामध्ये पसरविण्याचे हे षडयंत्र आहे. हे लोक अरएसएसवाले आहेत. मनोहर कुलकर्णी नावाचा माणूस स्वत:ला संभाजी भिडे म्हणवून घेतात आणि असे विचित्र विधान करतात. हे सहन केले जाणार नाही. या विकृतीला कुठेतरी संपवावे लागेल. गृहमंत्री त्यांच्यावर गुन्हा का दाखल होऊ देत नाहीत.
हेही वाचा – महाराष्ट्रात ‘युवा पर्यटन मंडळ’ स्थापित होणार, राज्य शासनाचा निर्णय
राष्ट्रपित्याबाबत असं म्हणणं हे यांना कसं सहन होते? तसेच, तुमच्या आमच्यासारख्या सर्वांकडे ऑडिओ आहे. परंतु त्यांना मिळत नाही. पोलिसांनी व गुप्तचर विभाग झोपलं आहे का? गृहमंत्री आणि पोलिसांनी जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. राज्य सरकारचचं भिडेंना पाठीशी घालत आहे. नसेल तर संभाजी भिडे यांना अटक करून गुन्हे दाखल करा. संभाजी भिडे यांना अटक करून त्यांना महाराष्ट्रासह देशातून तडीपार करा, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
महाराष्ट्रामध्ये जातीय वादी तंटे वाढण्यासाठी सगळ्या गोष्टी होत आहेत का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना का अभय देतायत? महाराष्ट्राची शांतता संपवायची का? सरकार संभाजी भिडेंना अभय का देतय? पुन्हा एकदा संभाजी भिडे यांनी असा काही करायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात बघुन घेईन, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.