breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
२०२४ मध्ये काय होणार आहे? याचा अंदाज आता लावता येणार नाही- खासदार संजय राऊत
!["Money launderer Sam D'Souza in NCB office"; MP Sanjay Raut demands inquiry](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Sanjay-Raut1-1.jpg)
मुंबई |
“पश्चिम बंगालमधील पराभव हा भाजपाचा नसून नरेंद्र मोदी व अमित शाह यांचा पराभव आहे, असं माध्यमं म्हणत आहेत. तामिळनाडूत नरेंद्र मोदींची काही जादू चालली नाही. केरळमध्ये चालली नाही. त्यामुळे जर भविष्यात २०२४ मध्ये काय होणार आहे? याचा अंदाज तुम्हाला आता लावता येणार नाही.
राजकारण हे अत्यंत चंचल असतं. इंदिरा गांधींनी देखील हे राजकारण आपल्या मुठीत ठेवता आलं नाही. पंडित नेहरूंना ठेवता आलं नाही, कुणालाच ठेवता आलं नाही आणि अटलजींनी देखील ठेवता आलं नाही.” असंही यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.