दोन भारतीयांची ८ वर्षांनी घरवापसी; पाकिस्तानी रेंजर्सने केली होती अटक
![Two Indians return home after 8 years; The arrest was made by Pakistan Rangers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/wagha-border.jpg)
नवी दिल्ली |
बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्याबद्दल आठ वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले दोन भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत. ८ वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या दोन भारतीय नागरिकांना वाघा सीमेवर बीएसएफ (BSF) जवानांकडे सोपविण्यात आले. या दोघांवर बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्याचा आरोप होता. २०१३ मध्ये शर्मा राजपूत आणि राम बुहादार यांनी काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला होता, त्यानंतर त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने अटक केली होती. एका सरकारी अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, या दोघांनी नकळत सीमा ओलांडली होती. यांची छायाचित्रे आणि इतर दाखले भारतासोबत शेअर करण्यात आले होते. भारताने या दोघांना नागरिक म्हणून स्वीकारले आणि त्यानंतर पाकिस्ताने त्यांना सोमवारी बीएसएफच्या स्वाधीन केले.
तसेच कथित हेरगिरी आणि बेकायदेशीर सीमा ओलांडण्याच्या आरोपाखाली एक वर्षापूर्वी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या १९ भारतीय नागरिकांची प्रकरणे अजूनही फेडरल रिव्ह्यू बोर्डाकडे प्रलंबित आहेत. देशाच्या सुरक्षा कायदा आणि गुप्त सेवा कायद्याअंतर्गत पाकिस्तानी पोलीस आणि रेंजर्सनी देशाच्या विविध भागातून १९ भारतीयांना अटक केली. त्यांना वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याला फेडरल रिव्ह्यू बोर्डसमोर सादर करण्यात आले, ज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा समावेश होता. त्याच वेळी, फेडरल अंतर्गत मंत्रालयाने आपले आरोप सादर केले. गृहमंत्रालयाच्या चौकशी अहवालाच्या आधारे त्यांच्या प्रकरणांचा निर्णय होईपर्यंत बोर्डाने त्यांच्या कोठडीत वाढ केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.