breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

आज अखेरच्या टप्प्यात ५७ जागांसाठी मतदार देणार कौल

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान होईल. त्यावेळी देशातील ७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मिळून ५७ जागा मतदानाला सामोऱ्या जातील. अखेरच्या टप्प्यामुळे राजकीय महासंग्रामासाठीच्या मतदानाची मॅरेथॉन प्रक्रिया पूर्णत्वास जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी मतदारसंघाचा अंतिम टप्प्यात समावेश आहे. त्या टप्प्यात एकूण ९०४ उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यांचे भवितव्य १०.०६ कोटी मतदार ठरवतील. पंजाबमधील सर्व १३ आणि हिमाचल प्रदेशातील सर्व ४ जागांसाठी अखेरच्या टप्प्यात मतदान होईल.

उत्तरप्रदेशातील १३, पश्‍चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८, ओडिशातील ६ आणि झारखंडमधील ३ जागांसाठी मतदार त्यांचा कौल देतील. त्याशिवाय, चंदिगढमधील एकमेव जागेसाठीही मतदान होणार आहे.

अखेरच्या टप्प्यात निवडणूक लढवत असलेल्या इतर प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी, अभिनेत्री कंगना राणावत, राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांचा समावेश आहे.

लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. त्यासाठी मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी एकूण ७ टप्प्यांचे नियोजन करण्यात आले. त्या मॅरेथॉन प्रक्रियेचा प्रारंभ १९ एप्रिलला झाला.

ओडिशा, आंध्र प्रदेश, अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीम या ४ राज्यांत लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकांसाठीही मतदान झाले. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे ४ जूनला जाहीर होईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button