breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अजित पवार अमित शाहांना चोरून का भेटत होते? सुप्रिया सुळेंचा सवाल

नवी दिल्ली | अजित पवार महायुतीत जाण्यापुर्वी दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी मास्क आणि टोपी घालून म्हणजेच वेश बदलून जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे गृहमंत्री अमित शाह यांना चोरून का भेटत होते? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार हे नाव आणि वेश बदलून दिल्लीला जात अशत आसं त्यांनीच म्हटलं आहे. याबाबत मला तीन ते चार प्रश्न विचारायचे आहेत. त्यावेळी तुम्ही विरोधी पक्षनेते होतात. मग विरोधी पक्षनेते असतानाही तुम्ही अमित शाह यांना का भेटत होतात? आता तुम्ही हे कबुल केलं आहे की तुम्ही अमित शाह यांना चोरून भेटत होतात. त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात बोलत होतात आणि दुसरीकडे दिल्लीत त्यांच्याच नेत्यांना भेटत होतात. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राशी गद्दारी केली.

हेही वाचा     –     आयफोन १५ वर मिळणार बम्पर डिस्काऊंट, जाणून घ्या किती रुपये वाचणार?

दुसरा मुद्दा असा आहे की, अजित पवार सातत्याने नाव बदलून दिल्लीला जात होते. पण हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना विमानाने यायचं म्हटलं तर आधार कार्ड लागतं. आता अजित पवारांनी असं केलं तर उद्या दहशतवादी असं करेल. तोही नाव बदलून येईल. याची जबाबदारी कोण घेणार? यामध्ये मुंबई आणि दिल्ली विमानतळाची चौकशी झाली पाहिजे. तसंच एअरलाईन्सची देखील चौकशी झाली पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तुम्ही ज्या माणसांना ओळखत नाही, त्या माणसाला एअलाईन्सने परवानगी कशी दिली? याबाबत केंद्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे. एवढे लोक विमानाने फिरतात, मग या देशात काहीच सुरक्षा नाही का? माझा हा प्रश्न आहे की अजित पवार हे अमित शाह यांना असं चोरून का भेटत होते? त्यांच्यामध्ये असं काय शिजत होतं? असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button