मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला, तुम्ही तुमच्या भावावर ठेवलात का? शर्मिला ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
![Sharmila Thackeray said I trusted my nephew, did you trust your brother?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Uddhav-Thackeray-and-Sharmila-Thackeray-780x470.jpg)
मुंबई : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. यावरून राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले. यावरून शर्मिला ठाकरे यांनी पलटवार केला आहे.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, उद्धव ठाकरेंनी आम्हाला आभार मानायची संधी त्यांनी कधीच आम्हाला दिली नाही. लहान भावाला कायम बोलतात, टोमणे मारायची संधी सोडत नाहीत.मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला. मात्र आम्हाला अजून आभार मानायची वेळ आली नाही. लहान भावाला कायम बोलतात टोमणे मारायची संधी सोडत नाहीत.
हेही वाचा – सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत २ ठराव; छत्रपती संभाजीराजे यांची माहिती
अदानींना प्रश्न केला, चमचे का वाजू लागलेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला. यावरून शर्मिला ठाकरे म्हणाल्या, दीड वर्षांपूर्वी अदानी मातोश्रीवर भेटायला कशाला गेले होते हे तुम्ही शोधा. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यांचे हात धरले होते का? चांगले निर्णय घ्यायला त्यांना कोणी थांबवलं होतं? सर्व विरोधी पक्ष नेते म्हणतात की, आरक्षण द्या पण मराठा आरक्षण त्यांनी का दिल नाही? तुम्हाला कोणी थांबवलं होत? शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसला होतात. धारावीचा पुनर्विकास करायचा होता मग तुम्ही का केला नाही साहेबांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.
शर्मिला ठाकरे आदित्य ठाकरेंविषयी नेमकं काय म्हणाल्या?
मला असं वाटत नाही आदित्यअसं काही करेल, चौकशा तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या.