breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही’; शरद पवारांचं विधान चर्चेत

पुणे | महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने प्रचार करत असली तरी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी किमान पडद्याआड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची मागणी केली. त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री कोण असेल, हा माझ्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी पक्षात कोणीही इच्छुक नाही. कोणालाही मुख्यमंत्री होण्यात रस नाही. राज्यात आम्हाला सुशासन द्यायचे आहे. त्यासाठी सरकारमध्ये बदल हवा आहे. जनतेला पर्याय हवा आहे आणि आम्हाला परिवर्तन हवे आहे. त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार किंवा कोण होणार नाही, हे महत्त्वाचे नाही.

हेही वाचा     –      कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही; मुंबई हायकोर्टाचे आदेश 

बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, या प्रकाराबाबत सतर्क राहून भूमिका घेतली पाहिजे. बालिका आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यासंदर्भात दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. राज्याच्या गृहखात्याने यासंदर्भात ठोस कार्यवाही करणे आवश्यक आहे. अत्याचारांच्या वाढत्या घटनांसंदर्भात जनतेच्या मनात रोष आहे. त्याविरोधात संघर्षाची भूमिका घेण्याऐवजी शनिवारी (२४ ऑगस्ट) एक दिवसाचा बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलींच्या सुरक्षतितेसाठी जनता एकत्र येईल, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button