‘राहुलजींनी आणखी लोकांमध्ये मिसळून काम करायला हवं’; सत्यजीत तांबेंचा राहुल गांधींना सल्ला
![Satyajit Tambe said that Rahul Gandhi should work with more people](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/rahul-gandhi-and-satyajeet-tambe-780x470.jpg)
भारतीय जनता पार्टीने काय केलं? हे ऐकण्यात कुणालाही रस नाही
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना होळीनिमित्त खास सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, राहुल गांधींना होळीच्या शुभेच्छा देताना मी एवढंच सांगेन की, राहुलजींनी आणखी लोकांमध्ये मिसळून काम करायला हवं.
भारत जोडो यात्रेतून त्यांनी हे केलंच आहे. पण अजून त्यांनी लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. लोकांमध्ये आलं-गेलं पाहिजे. यामुळे लोकांच्या मनातील कटू भावना दूर झाल्या पाहिजेत, असं सत्यजीत तांबे म्हणाले.
विरोधक असो वा सत्ताधारी असो, एकत्र येऊन त्यांनी या देशासाठी कसं चांगलं काम करता येईल, हे आताच्या पिढीतील लोकांना पाहायचं आहे. भारतीय जनता पार्टीने काय केलं? हे ऐकण्यात आता कुणालाही रस राहिला नाही. आपण काय देशातील जनतेला खऱ्या अर्थाने रस आहे. मला असं वाटतं की जुनं ते सगळं सोडून आपण काय करू शकतो, यावर त्यांनी काम करायला हवं, असं मला वाटतं. बुरा ना मानो होली है! , असा सल्ला सत्यजीत तांबेंनी राहुल गांधींना दिला.