breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आरक्षण म्हणजे काय परड्यातली भाजी आहे का? कोणीही उठावे आंदोलन करावे; सदाभाऊ खोत यांचं विधान

मुंबई | आरक्षण म्हणजे काय परड्यातील भाजी आहे का? कुणीही उठावे आणि आरक्षण मागावे, असं म्हणत महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाने राजकारण केलं जातंय, असा आरोप विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. राज्यात आरक्षणाचे राजकारण केले जात आहे, जनतेने हे डाव आता ओळखले पाहिजेत असंही ते म्हणाले.

सदाभाऊ खोत म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकसभेला महाविकास आघाडीला मतदान झाले आणि असे सांगितले गेले की मराठा आरक्षणाला भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा विरोध आहे. मग आता महाविकास आघाडीचे जे खासदार निवडून आले आहेत त्यांनी लिहून द्यावे की ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यासाठी आमचा पाठींबा आहे. अगदी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीही तसे लिहून द्यावे. यांना कोणालाही हा प्रश्न सुटू द्यायचा नाही. चिघळू द्यायचा आहे.

हेही वाचा     –      शरद पवारांची भेट का घेतली? छगन भुजबळांनी भेटीचं कारण सांगितलं..

लोकसभेला आपलं जमलंय, आता त्यावर स्वार होऊन विधानसभेला जिंकता येतंय का हेच काम महाविकास आघाडीचं चालू आहे. मी मराठा समाजाला विनंती करतो की आपण मिळालेले १० टक्के आरक्षण टिकवूया असं सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच, शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचे काम शरद पवारांनीच केल्याचा त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button