breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकारण

“शिंदे-फडणवीस सरकार सूड भावनेतून स्थापन झालेलं आहे”; रोहित पवार

नागपूर :
शिंदे फडणवीस सरकारमध्ये खुप गोंधळ आहे. सरकार बदला घेण्यासाठी स्थापन झालेलं सरकार आहे. 40 लोकांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांची आहे. तर भाजपच्या आमदारांची जबाबदारी घेण्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांची आहे. यांची काळजी घेत असताना महाराष्ट्रातील मुख्य प्रश्न बाजुला राहत आहेत, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षावर केला आहे.

अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टानेच ताशेरे ओढले आहेत. सगळे पुरावे उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही एखाद्या नेत्याची पाठराखण करत असाल तर तुम्ही वेगळा संदेश देत आहेत. निकाल जर त्यांच्या बाजुने लागला तर त्यांना परत पद द्या पण आत्ता त्यांचं पद घालवून लोकांना चांगला संदेश देण्याची गरज आहे, असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

कर्नाटक सरकारने जो ठराव मांडला आहे त्यामध्ये वकिलांचं नाव देखील दिलेलं आहे. वकील मोठे आहेत. आपल्याकडून मोठ्या वकिलांचं नावं नाही. मोठ्या वकिलांचं नाव असं आम्हाला वाटतं. याचसोबत त्यांच्या ठरावात महाराष्ट्रातील नेत्यांच्या विरोधात बोललं गेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या ठरावात अधिकाऱ्यांवर बोललं गेलं आहे. किमान महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच तरी नाव असावं असं आमचं मत आहे, असंही आमदार रोहित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button