‘..तर मी उद्धव ठाकरेंच्या घरी भांडी घासेन’; शिंदे गटातील नेत्याचं विधान
![Ramdas Kadam said that if he proves that he took the boxes, he will wash the dishes at Uddhav Thackeray's house](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Uddhav-Thackeray-4-780x470.jpg)
मुंबई | शिवसेना शिंदे गटाने नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. ४० आमदारांपैकी एकाने जरी ५० खोके घेतल्याचं सिद्ध केलं तर मी उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन भांडी घासेने, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी झाली पाहिजे, असही ते म्हणाले.
रामदास कमद म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसह काम करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. पण आत्ता जे महाराष्ट्रात बाप-बेटे दोघेजण बडबड करत आहेत. उद्धव ठाकरे आणि त्याचं पिल्लू, यांचं बोलणं, वागणं आणि टोमणे हे पाहिले तर एखादा दिवा विझताना जसा फडखडतो तशी फडफड या दोघांची सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांचं कलम ३७० हटवण्याचं आणि राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं. तरीही पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातच बोलण्याचं काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करत आहेत.
हेही वाचा – खासदार श्रीरंग बारणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; नीलशे हाकेंच्या वतीने फळवाटप
अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी महाराष्ट्राचा नालायक मुख्यमंत्री कोण ठरलं असेल तर हा (उद्धव ठाकरे) माणूस. ४० पैकी एकाही आमदाराने ५० खोके घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन असं आव्हानच मी करतो आहे. आम्हाला फक्त बदनाम करण्यासाठी हे केलं जात आहे. आपल्याकडून मुख्यमंत्रीपद का गेलं? पद का सोडावं लागलं? ४० आमदार, १० अपक्ष आमदार आणि १३ खासदार हे सगळे का निघून गेले याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी ज्या ज्या नेत्यांना घडवलं त्यांना संपवण्याची सुपारीच उद्धव ठाकरेंनी घेतली असल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला.
आम्ही पुष्कळ मिठाईचे खोके दिले होते. मात्र तिथे धबधबा सुरू रहावा लागतो. पुढच्या दहा दिवसांत उद्धव ठाकरेंबरोबर असलेले आमदार एकनाथ शिंदेंना साथ देतील. उद्धव ठाकरेंना फक्त टोमणे मारता येतात. मी एकनाथ शिंदेंकडे मागणी केली आहे की उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळणार आहे की भ्रष्टाचारी कोण आहे. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत आणि त्याच अनुषंगाने काम करत आहोत, असंही रामदास कमद म्हणाले.