औरंग्याबाबतच्या वक्तव्यानंतर नितेश राणेंचे जितेंद्र आव्हाडांना पत्र
![Nitesh Rane's letter to Jitendra Awada after his statement on Aurangya](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/nitesh-rane-and-jitendra-awhad-780x470.jpg)
काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे
मुंबई : औरंगजेब क्रूर असता तर त्याने विष्षूचे मंदिरही तोडले असते ना? असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्र लिहीत जितेंद्र आव्हाड यांना निशाण्यावर धरलं आहं.
आपण औरंग्याबाबत औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना? असे केलेले वक्तव्य स्वाभिविकच आहे, कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे केव्हाच सिद्ध झाले आहे. कारण त्यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समधीवर एकदाही नतमस्तक केले नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळले नाही.
काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असं घोषीत करतो. औरंगदेबाने धर्मातर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्या तरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदूधर्मासाठी बलिदान दिले.
आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादी देत आहे. मला खात्री आहे, आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय
औरंग्याने आपल्या आयुष्यामध्ये लहान मंदिरे खूप तोडलेली आहेत पण प्रामुख्याने जी मोठी मंदिरे त्याने तोडली आहेत त्याची यादी खाली नमूद केलेली आहे.सोमनाथ मंदीर, कृष्ण जन्मभूमी मंदीर, काशी विश्वनाथ मंदीर, विशश्वेर मंदीर, गोविंददेव मंदीर, विजय मंदीर, भीमादेव मंदीर, मदन मोहन मंदीर, चौंषष्ठा योगिनी मंदीर, एलोरो मंदीर, त्र्यंबकेश्वर मंदीर, नरसिंगपूर मंदीर, पंढरपूर मंदीर , असं पत्र नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना पाठवले आहे.