‘मी मुख्यमंत्री होण्याची कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण व्हावी’; नाना पटोले यांचं विधान चर्चेत
![Nana Patole said that the wish of the workers should be fulfilled for me to become the Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Nana-Patole--780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर मुख्यमंत्री पदावरून स्तत्याने चर्चा पाहायला मिळत आहेत. असातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदावरून मोठं विधान केलं आहे.
नाना पटोले म्हणाले, सध्या श्रावण महिना सुरु असून हिंदू संस्कृतीमध्ये हा धार्मिक महिना समजला जातो. तर, आम्ही कोणासारखा दिखावा करत फिरत नाही. तसेच मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षात धार्मिक भावना दुखावण्याचे कोणतेही काम होत नाही. त्यामुळे जे सर्व धर्माचे प्रतीक आहे, त्या ठिकाणी मी दर्शनासाठी जातो. तसेच नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अशी जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो.
हेही वाचा – ‘राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अपूर्वा अलाटकर हीचा सन्मान’; वर्षा जगताप
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अमित शाह यांना भेटल्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राष्ट्रवादीत काय सुरू आहे हे आम्हाला बघण्याचं कारण नाही. तर हा बापच असतो, एक मुलाने गडबड केली तरी फरक पडत नाही, असा टोलाही लगावला.
राज्यात सध्या बधीर आणि नालायक सरकार आहे. भय आणि भ्रष्टाचाराच्या बळावर हे सरकार आहे. अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहे हे अध्यक्षांना देखील माहित नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे, लोकशाहीचा गळा घोटणे सुरु आहे. आम्ही हे सगळं जनतेपर्यंत घेऊन जाऊ, आणि जनतेला सगळं सांगू, असंही नाना पटोले म्हणाले.