ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मनोज जरांगे यांची सरकारसह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका

मराठ्यांच्या विरोधात जाल तर तुमचा पक्ष संपून जाईल : मनोज जरांगे

महाराष्ट्र : शेतकरी, धनगर बांधवांचे प्रश्न, ओबीसी बांधवांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत, मुस्लिम दलित लोकांसोबत तुम्ही तसेच वागणार हे योग्य नाही. वेळ आल्यास मग थातूरमातूर योजना काढून पुन्हा सत्तेवर बसणार… तुम्ही लोकांना वेड्यात काढताय हे लोकांना आता लक्षात येतंय, असे वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

ओबीसीत मराठा आरक्षण असताना देखील ते आम्हाला आरक्षण देत नाहीत. अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, मराठ्यांच्या विरोधात जाल तर तुमचा पक्ष संपून जाईल. देवेंद्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मराठा आरक्षणावर काम करू देत नाहीत. हैदराबाद येथील नोंदी का आणू देत नाहीत..? राग येणारच तुम्ही मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मराठा आरक्षणावर काम करूच देत नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. तर गुन्हे मागे घ्यायचे तर ते गुन्हे वाढतच चालले आहेत. तर सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची देखील अंमलबजावणी केली जात नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. जातिवंत मराठा भाजप पक्षात राहणार नाही आणि एकही माणसाला निवडून आणू येऊ देणार नाही असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button