अजित पवार मुख्यमंत्री होणार? जयंत पाटील म्हणाले,..
अजित पवारांशी किंवा पक्षात कोणाशीही माझी स्पर्धा नाही
मुंबई : अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेबद्दल राज्यभर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्यानं मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, खासदार अमोल कोल्हे यांनी केलेले ते विधान प्रतीक पाटील आणि माझ्या कौतुकासाठी होते. मात्र, उद्देश काही नाही. अजित पवारांशी किंवा पक्षात कोणाशीही माझी स्पर्धा नाही. पोस्टरबाजी आणि मागणी या कार्यकर्त्यांच्या भावना असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या आवश्यक बहुमत असल्याचे अजित पवार आणि आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आमच्यात कोणताही वाद नाही. राज्यभरात विविध प्रकारची पोस्टर झळकली तरी उत्साही कार्यकर्त्यांच्या त्या अपक्षा असतात.
अजित पवार यांच्या नेतृत्वात विधिमंडळात आमचे आमदार एकसंधपणे कार्यरत आहेत. पुढील काळात आमचा पक्ष कसा वाढेल, याकडे लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत त्याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर एकमताने चर्चा होईल, पण आमच्यात कोणताही वाद नाही. अजित पवारांशी किंवा पक्षात कोणाशीही माझी स्पर्धा नाही. पोस्टरबाजी आणि मागणी या कार्यकर्त्यांच्या भावना असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या आवश्यक बहुमत असल्याचे अजित पवार आणि आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आमच्यात कोणताही वाद नाही. राज्यभरात विविध प्रकारची पोस्टर झळकली तरी उत्साही कार्यकर्त्यांच्या त्या अपेक्षा असतात, असंही जयंत पाटील म्हणाले.