स्मार्ट सिटीतील रिक्षा चालक देखील स्मार्ट झाल्यास नागरिकांना उत्तम प्रवासी सेवा मिळेल : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
![If auto rickshaw drivers in smart city also become smart, citizens will get better passenger service: Commissioner of Police Krishna Prakash](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Image-2021-08-10-at-5.46.39-PM.jpeg)
चाकण । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड, पुणे शहर हे स्मार्ट सिटी शहर म्हणून पुढे येत आहे “रिक्षाचालकांन मुळे शहराची ओळख निर्माण होते” शहरात येणारे नागरिकांना रिक्षा चालक अगोदर भेटतात रिक्षाचालकांच्या वागण्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था कशी आहे हे दिसून येते यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात मीटर सक्ती करून ऐतिहासिक मीटर सक्तीचा कार्यक्रम आपण राबवला, आता वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी आणि नागरिकांना उत्तम प्रवासी सेवा मिळावी यासाठी स्मार्ट सिटीतील रिक्षाचालक ही स्मार्ट झाले पाहिजे, यासाठी रिक्षाचालकांनी ड्रेस घातला पाहिजे, सौजन्याने वागले पाहिजे, आधुनिक साधनांचा वापर करत स्मार्ट रिक्षा चालक बना असे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, चाकण येथे 09 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी क्रांती दिनाच्या निमित्ताने वाहतूक विभाग आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेड संयुक्त पणे या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले, चाकण पोलीस निरीक्षक .अशोक राजपूत, माजी उपसरपंच मनोजदादा खांडेभराड , रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे, चक्रेश्वर रिक्षा स्टँडचे अध्यक्ष कैलास नाना वलांडे आदी मान्यवर व्यासपीठा वर उपस्थित होते, यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील मटका, दारू, जुगार सह सर्वच बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्यात आली तसेच मोठ्या प्रमाणात मोका कायद्यांतर्गत कारवाई करून गुंडांचा बंदोबस्त करण्यात आला यामुळे माझ्या मनात कृष्ण प्रकाश आणि कायद्याबाबत प्रचंड आदर निर्माण झाला याबाबत आपण काय करू शकतो असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला यावेळी मी ठरवले आम्ही रिक्षाचालक देखील कायद्याचे पालन करून मीटर ने रिक्षा चालवतील आणि आम्ही शहरात मिटर डाऊन कार्यक्रम घेतला याचा नागरिक व रिक्षाचालकांना ही फायदा होत आहे, वाहतुकीला शिस्त आणि स्मार्ट रिक्षाचालक या संकल्पनेचे देखील आम्ही स्वागत करत आहोत, असे बाबा कांबळे म्हणाले.
कृष्ण प्रकाश म्हणाले, पोलीस आणि रिक्षा चालकां मध्ये साम्य आहे आम्हालाही खाकी ड्रेस आहे तुम्हाला पण आहे आम्हाला बक्कल नंबर आहे तुम्हाला बॅच नंबर आहे, पोलिस दिवसभर रस्त्यावर असतो तुम्ही पण रस्त्यावर असतात, फक्त आम्हाला कायदा-सुव्यवस्था चे जास्त अधिकार आहेत, परंतु तुम्हाला नागरिकांची सेवा करण्याची अधिक संधी आहे, कोरोना मध्ये ॲम्बुलन्स कमी पडत होते, यावेळी रिक्षाचालकांनी रिक्षाला ॲम्बुलन्स बनवून नागरिकांना सेवा दिली आहे, ईश्वर सेवेचे काम तुम्ही केले आहे तुम्ही दिलेल्या सेवेत बद्दल कोविड योद्धा म्हणून तुमचा सन्मान करताना आनंद होत आहे, फायनान्स कंपनीच्या वतीने चुकीच्या पद्धतीने वसुली सुरू असल्याबाबत तक्रार प्राप्त झाले आहेत लवकरच याबाबत फायनान्स कंपनी सोबत बैठक घेऊन मार्ग काढू, नियम न पाळल्यास इतरांना शिस्त नियम बाबत आपण अधिकार वानीने बोलू शकत नाही, सर्वांनी वाहतुकीचे नियम व शिस्त पाळावी असे आवाहन देखील कृष्ण प्रकाश यांनी रिक्षाचालकांना केले.
यावेळी कोविड योध्दा म्हणून लक्ष्मन शेलार, जाफर शेख, सुरज सोनवणे, रविंद्र लंके, अनिल शिरसाठ, अजय साळवे, तुषार लोंढे, संजय दौंडकर, सिध्देश्वर सोनवणे, अविनाश जोगदंड, प्रदिप अय्यर, गजानंन लोनारी, माऊली शिंदे, किरण मुंगसे, भानुदास गांडेकर , अतिष भुजबळ, किरण खांडेभराड, दिपक कुसाळकर ,मनिष दौंडकर, लक्ष्मण गांडेकर, संतोष मस्के, शंकर जोगदंड, अक्षय वलांडे, बाळासाहेब बागडे, यांचा सन्मान करण्यात आला,
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी किरण खांडेभराड, राजाभाऊ शिंदे, पोपट मामा खांडेभराड दिपक कुसाळकर, मनिष दौंडकर यांनी परिश्रम घेतले.