breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

एकनाथ शिंदेना मिळणार मुख्यमंत्रिपद, भाजपची खेळी; आता उद्धव ठाकरेंची भूमिका कशी असेल?

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आता थेट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपनं घेतल्यानं उद्धव ठाकरेंपुढे कोणती भूमिका घ्यायची असा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेची पुढील भूमिका नेमकी कशी असेल? १६ आमदारांविरोधात करण्यात आलेली कारवाई शिवसेनेची पुढील वाटचाल याबाबत उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देत भाजपची खेळी

उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियात सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर खुशाल जावा, असं म्हटलं होतं. आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी सेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. सेनेतील आमदार भाजपनं फोडले, भाजप या बंडामागं असल्याचा आरोप करण्यात येत होता. आता थेट भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिल्यानं उद्धव ठाकरेंसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
  • शिवसैनिक मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंपुढे पेच
उद्धव ठाकरे यांनी एका फेसबुक लाईव्ह मधून मुख्यमंत्री होणार असाल तर खुशाल जावा म्हटलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपसोबत जाऊन गुलामी करावी लागेल, असं म्हटलं होतं. आम्ही सत्तेच्या पाठीमागं नाही आहोत, ही तत्त्वाची लढाई आहे, हिंदुत्त्वाची लढाई आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. आता शिवसैनिक मुख्यमंत्री झाला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळं ज्या १६ जणांची आमदारकी रद्द करण्यासाठी केलेली कारवाई मागं घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार का हे पाहावं लागेल.

भाजपशी पुन्हा जुळवून घेणार?

भाजप आणि शिवसेनेमध्ये २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाद झाला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. सेनेच्या बंडखोर आमदारांच्या भाजपच्या आमदारांच्या पाठिंब्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाहेर ठेवत शिवसैनिकाला भाजपनं मुख्यमंत्री केलं आहे. उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपशी जुळवून घेतात की वेगळी भूमिका घेतात हे थोड्याच दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button