ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

“देवेद्र फडणवीसांनी बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं” नाना पटोले

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी झोटिंग समितीच्या अहवालावर प्रतिक्रिया करताना मोठं विधान केलं आहे. देवेद्र फडणवीसांनी बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. खडसेंचंही राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला, असं सांगतानाच तत्कालीन फडणवीस सरकारमधील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन अनेक मंत्री अडचणीत येतील, असा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाल्यानंतर पुन्हा सापडला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. देवेद्र फडणवीसांनी बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. खडसेंचं राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. फडणवीस सरकारमधील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन अनेक मंत्री अडचणीत येतील, असं सांगतानाच झोटिंग समितीचा अहवाल वाचला नाही. तो पुढे येईल तेव्हा त्यातील फार्स कळून येईल, असं पटोले म्हणाले.

 

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर विश्वासघाताचा आरोप करतानाच काँग्रेसची भूमिकाही स्पष्ट केली. स्वबळावर लढायचं की नाही ही आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी राहील. आमची लाईन तयार आहे. आम्ही अनेक वेळा ठेच खाल्ली आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण तयारीनिशी उभे राहणार आहोत. 2014 मध्ये आमच्यासोबत विश्वासघात झाला. तसा विश्वासघात पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण तयारीनिशी राहणार आहोत. जो काही निर्णय घ्यायचा तो पार्टी स्टॅटेजीच्या आधारे घेऊ, असं पटोले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button