breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#CoronaVirus: महाराष्ट्रातल्या परप्रांतीय मजुरांना गावी पाठवण्याचा खर्च कोण उचलणार?, सरकारपुढे प्रश्न
![AIIMS chiefs give important advice to government on country level lockdown](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/lock-down-1-shutter-1.jpg)
केंद्र सरकारने आंतरराज्य प्रवासाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन पर राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना व नागरिकांना आपापल्या राज्यांमध्ये व गावांमध्ये जाण्याची मुभा दिली खरी, पण महाराष्ट्रामध्ये अडकलेल्या व लाखोंच्या संख्येने असलेल्या या लोकांना परत पाठवण्यात बाबतच्या अडचणींना महाराष्ट्र शासन तोंड देत आहे.
केंद्र सरकारने परराज्यात अडकलेल्या लोकांना आपापल्या गावी पोहचवण्यासाठी रेल्वेचा वापर करून घेण्याबाबत स्पष्ट नकार दिल्याने या मंडळींना बसनेच पोहचवावे लागेल. पण याबाबतचा खर्च कुणी करायचा हा मोठा प्रश्न आहे कारण महाराष्ट्रात अडकलेल्या व आपापल्या गावी जाऊ पाहणाऱ्या लाखोंच्या संख्येने असलेल्या मजुरांन तिथे पोचवण्याचा खर्च जर फक्त महाराष्ट्र सरकारला उचलावा लागला तर हा मोठा भुर्दंड असेल.