#CoronaVirus: केजरीवाल म्हणतात, “कोरोना झाला आणि लोकं बरी होऊन घरी गेली तर चालेल; फक्त…”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/EY2AZ1BUMAAa8jf.jpeg)
देशभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं असलं तरी लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मात्र मोठ्या प्रमाणात सुट देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील दिल्लीत सुट देण्याचा निर्णय घेतला होता. आज (सोमवार) केजरीवाल यांनी जनतेला संबोधित केलं. “करोना व्हायरसनिमित्ता जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये सुट मिळाली तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. करोनाचे जेवढे रुग्ण रोज सापडत आहेत, तेवढेच रुग्ण बरेही होत आहेत. दिल्ली करोनाचा सामना करण्यासाठी तयार आहे. सध्या करोना जाणार नाही. त्यामुळे काम सुरू ठेवण्यासाठी ही सुट देणं आवश्यक होतं,” असं केजरीवाल म्हणाले.
लॉकडाउनमधून सुट दिली असली म्हणून कोणी घाबरून जाण्याचं कारण नाही. करोनाची लागण होत असली तरी त्यातून बरे होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. करोनामुळे फक्त कोणाचा मृत्यू होऊ नये. आतापर्यंत दिल्लीत दिल्लीत १३ हजार ४१८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ६ हजार जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याचं केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी खासगी रुग्णालयांनाही फटकारलं.
COVID-19 cases have increased in Delhi due to relaxations in lockdown. But there is nothing to worry about unless the mortality rate or the number of serious cases rises rapidly. If people contract the virus & recover, then there is nothing to worry about:Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/VjMDBm0JhG
— ANI (@ANI) May 25, 2020