मुंबईत भाजपा पराभव अटळः अंबादास दाणवे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचा करिश्मा मुंबईत चालणार नाही
![BJP's defeat in Mumbai is inevitable: Ambadas Danve](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Ambadas-Danave-780x470.jpg)
मुंबईः महाराष्ट्राच्या मातीत एव्हढी ताकत आहे की, त्यामुळे पंतप्रधांना रस्त्यावर उतरावे लागले. याला शिवसेना कारणीभूत आहे. ज्या घाटकोपरमध्ये रोड शो झाला त्याच ठिकाणी परवा मोठी दुर्घटना घडली आहे. त्यात 16-17 लोकं मृत्यूमुखी पडले आहेत. अनेकजण जखमी आहेत. तिथूनच रोड शो काढण्यात आला ही संवेदनशिलता नसल्याचे जीवंत उदाहरण आहे. मोदी यांच्या रोडशोचा करिश्मा अजिबात मुंबईत चालणार नाही. त्यामुळे भाजपचा पराभव अटळ आहे, असे भाकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दाणवे यांनी केले आहे.
आपण लव जिहाद, भू जिहाद याबाबत ऐकलं आहे. मात्र, आता इंडिया आघाडीच्या नेत्यांनी व्होट जिहाद करण्याचे आदेश दिले आहेत. हे लोक मुस्लिमांना एकत्र येऊन भाजपाविरोधात व्होट जिहाद करण्यास सांगत आहेत, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसह इंडिया आघाडीच्या नेत्यांवर केला.
त्यास प्रत्युत्तर देताना दाणवे म्हणाले की, त्यांना वोट मिळत नाही. ते हरण्याच्या दिशेने जाताहेत. त्यामुळे ते लोकं अशी बोंब मारताहेत. त्यांना जर मत दिले असते तर… त्यांनी असा सवाल उपस्थित केला असता का. मुस्लीम व्होट मिळावे, यासाठी भाजप लोकं पैसे वाटताहेत. मुस्लीम व्होट मागण्यासाठीचे त्यांचे धंदे आम्हाला चांगले माहिती आहेत. आम्ही याचे पुरावे देऊ शकतो. असा प्रति सवालही अंबादास दाणवे यांनी केला.
मुंबईतील सहा जागा आहे त्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईत भाजपाचा पराभव अटळ आहे. मोदींच्या रोड शोचा काहीही परिणाम होणार नाही. कारण ज्या खासदारांनी चांगली कामे केली आहे. ज्या प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात भाजपा वाढलवा त्यांचीच मुलगी पुनम महाजन यांना उमेदवारी दिली नाही. गोपाळ शेट्टी यांनी चांगली कामे केली त्यांनाच उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मुंबईत सहाही जागांवर भाजपचा पराभव अटळ असल्याचे खोचक भाकीत अंबादास दाणवे यांनी केले आहे.