‘..अन्यथा सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही’; बच्चू कडू यांचा सरकारला इशारा
मुंबई : प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारने अंत पाहू नये. अन्यथा सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले, महाराष्ट्रातील मराठा कुणबी असून ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ज्यांच्या सरकारी दफ्तरी नोंदी कुणबी आहेत, त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्यास सरकारने सुरू करावे. आमच्याकडून जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आम्ही करू सरकारने आंदोलनाकडे आंदोलन म्हणून पहावे, पण इथे येणाऱ्याला सेल्फीचं पडल आहे. त्यांच्या आरोग्याचं काही पडलं नाही.
हेही वाचा – गणेशोत्सव 2023ः देश-विदेशात गणेश पूजनाचे महात्म्य, वाचा कोणकोणत्या देशात साजरा केला जातो गणेशोत्सव…
आज या लोकांनी जी ज्योत पेटवली आहे. त्याचा सन्मान करणं हे महत्त्वाचे आहे. वेळ पडली तर मी देखील उपाशी राहण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे सरकारने कोणताही अंत पाहू नये, अन्यथा पुन्हा एकदा सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही. तर महाराष्ट्रात मराठा कुणबी आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे सरकारने वेगळा कायदा करण्याच्या भानगडीत पडू नये, असंही बच्चू कडू म्हणाले.