breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नाना पटोलेंचा घातपात करण्याचा डाव होता का? काँग्रेस नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप

Nana Patole | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात नाना पटोले यांच्या गाडीचा पुरता चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण याच अपघातावरून काँग्रेसने भाजपावर गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढें यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे नाना पटोलेंना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.

हेही वाचा    –    नवनिर्माण सेनेचा ‘नमो’निर्माण पक्ष का झाला? ठाकरे गटाचा सवाल

दरम्यान, भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ नाना पटोले यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाला. नाना पटोले मंगळवारी आपली सुनिश्चित प्रचारसभा आटपून सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या उभ्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने मोठी घटना टळली. अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पुढील तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button