breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘मला फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर..’; अनिल देशमुखांचा मोठा दावा

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निलंबनाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केला. यानंतर शिंदे फडणवीस सरकारवर विरोधक टीका करत आहेत. दरम्यान, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, मला फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर करण्यात आला. त्याबदल्यात त्यांना बक्षीस म्हणून आमच्या सरकारने केलेलं परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलं. याबाबत मी आमच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सविस्तरपणे बोलणार आहे. या बैठकीनंतरच मी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी बोलेन, असं देशमुख म्हणाले.

हेही वाचा – ‘आरोपींना फाशीची शिक्षा द्या’; किशोर आवारेंच्या आईची चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

नेमकं काय आहे प्रकरण?

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. त्यानंतर परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. तेव्हा परमबीर सिंह म्हणाले होते की, अनिल देशमुख यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाढे यांना आठवड्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याशिवाय अनिल देशमुख यांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात जावे लागले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button