टीव्ही मुलाखती दरम्यान चिडले नवाब मलिक; अँकरच्या प्रश्नावर काढून टाकला माईक
![Angry Nawab Malik during TV interviews; Mike removed at Anchor's question](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/Maharashtra-bandh-mva-government-lakhimpur-kheri-violence-case-ncp-nawab-malik-interview-news-channel-1.jpg)
मुंबई |
महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारावर सोमवारी राज्यव्यापी बंद पुकारला होता. यावेळी राज्यातील सर्वच ठिकाणी बंद पाळण्यात आला. त्यानंतर मुंबईसह राज्यातील बाजारपेठा आणि वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. याबाबत राजकीय पक्षांनी बंदबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधकांनी महाराष्ट्र बंदवरून सरकारवर टीका केली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनीही बंदबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळ एका खाजगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान नवाब मलिक इतके चिडले की त्यांनी माईक काढला आणि निघून गेले. या मुलाखतीदरम्यान नवाब मलिक यांनी बंदबाबत भाष्य केले. आम्ही शेतकऱ्यांना निर्दयपणे मारण्याच्या कल्पनेच्या विरोधात उभे आहोत असे मलिक म्हणाले. यावेळी अँकरने तुम्ही जबरदस्तीने दुकाने बंद करू शकत नाही असे म्हटले. त्यावर मलिक यांनी तुम्हाला असे वाटते की हे जबरदस्तीने आहे, तुम्ही निवडक रेकॉर्डिंग दाखवा आमची हरकत नाही, असे म्हटले.
त्याचवेळी अँकरने विचारले की तुम्हाला महाराष्ट्र बंदमधून काय मिळाले? प्रत्युत्तरादाखल मलिक म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे ज्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या बंदने दबलेल्या लोकांनी लढण्याचा संदेश दिला आहे, कदाचित तुम्हाला समजले नसेल. अँकरने अनेक काँग्रेस नेत्यांनी मौन उपोषण ठेवले, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहचविल्याशिवाय हे काम मूक उपोषण करून करता येणार नाही का? जे दैनंदिन मजुरीवर काम करतात, रोज कमवतात आणि खातात, हे काम त्यांना हानी पोहोचवल्याशिवाय करता आले नसते? असा प्रश्न नवाब मलिकांना विचारला. मोदीजींनी तीन महिने बंद पाळला होता, मग तुम्ही रोजंदारीचा प्रश्न विचारला नाही? असा सवाल मलिक यांनी केला. यावर अँकरने मोदीजींनी ते बंद ठेवले, म्हणून तुम्हीही ते बंद ठेवत आहात? तो बंद जीव वाचवण्यासाठी होता, आजचा मारण्यासाठी बंद आहे. यावर नवाब मलिक म्हणाले की तुम्हाला जी काही बातमी दाखवायची आहे ती दाखवा. आम्हाला कोणताही आक्षेप नाही.
दुसरीकडे, राजस्थानमध्ये विरोध करण्याच्या प्रश्नावर नवाब मलिक म्हणाले की आमचा पक्ष तिथे नाही, मग अँकर म्हणाले की तुमचा पक्ष उत्तर प्रदेशमध्येही नाही. या प्रश्नावर नवाब मलिक गोंधळून गेले. ते म्हणाले की आंदोलन करायचे की नाही हे पक्ष ठरवेल… आणि आम्ही कुठे आहोत, हा प्रश्न विचारू नका. असे म्हणत नवाब मलिक यांनी आपला माईक काढला आणि मुलाखत सोडली. दरम्यान, बंदच्या अनुषंगाने राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने व रास्ता रोको करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात आठ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतही बंदच्या पार्श्वभूमीवर दोन गुन्हे व तीन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय मुंबईत २०० जणांना ताब्यात घेण्यात आले होते.